* आंबा बहरला, मात्र ढगाळ हवामानाने वाढवली चिंता* *चांगल्या उत्पादनाची आशा असताना रोग येण्याची शक्यता* वरोडा : शाम ठेंगडी यंदा तालुक्यातील आंबा झाडाला समाधानकारक बहर आल्याने आंबा उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही वर्षांपासून अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण व रोगांच्या प्रादुर्भावामुळे आंबा उत्पादक मोठ्या संकटात सापडले होते. मात्र यावर्षी थंडीचा कडाका, कोरडे वातावरण आणि पोषक हवामान यामुळे बहुतांश आंबा झाडांना एकसारखा व दाट मोहोर फुललेला दिसून येत आहे. त्यामुळे यंदा आंब्याचे उत्पादन चांगले होईल अशी शक्यता आहे. दरम्यान काही दिवसापासून तालुक्यात ढगाळ हवामान निर्माण झाल्याने आंबा उत्पादकांची चिंता वाढली आहे. सूर्यप्रकाश कमी होणे, हवेत आर्द्रता वाढणे आणि तापमानात होणारा चढ उतार यामुळे मोहोरावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण कायम राहिल्यास मोहोर गळण्याची भीती असून त्याचा परिणाम उत्पादनावर होऊ शकतो. या ढगाळ हवामानामुळे तुडतुडे, मुरी, करपा यासारख्या रोगांचा धोका वाढण्याची शक्य...
- Get link
- X
- Other Apps