*महापुरुष केवळ कार्यक्रमापुरतेच नसावे:आलोक जाधव* वरोडा : शाम ठेंगडी स्वधर्माच्या रक्षणार्थ शिवराय व शंभुराजे यासारख्या ज्या महापुरुषांनी आपले बलिदान दिले. त्या महापुरुषांना डोक्यावर नाचविण्यापेक्षा त्यांना डोक्यात जपले पाहिजे. यामुळे स्वधर्माचे रक्षण होईल. स्वधर्म टिकला तरच आपले अस्तित्व राहील.महापुरूष केवळ कार्यक्रमापुरतेच नसावे तर त्यांचे स्मरण रोज करणे आवश्यक आहे. कारण त्यांच्यामुळेच आज आपण आहोत असे विचार वरोडा मराठा समाजाचे सचिव आलोक जाधव यांनी काढले. येथील स्वामीनाथा विद्यालयामध्ये 18 फरवरी रोज बुधवारला आयोजित शिवजयंतीच्या कार्यक्रमात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी सरबती बागला कॉन्व्हेंटच्या माजी मुख्याध्यापिका विद्या देव-ठेंगडी व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वर्षा चतुरकर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी विद्या देव-ठेंगडी यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग सांगून आपण सर्वांनी धर्माच्या रक्षणार्थ त्यांच्यासारखे बनण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त...
- Get link
- X
- Other Apps