*चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची चंद्रपूर, बल्लारपूर व वरोरा विधानसभेवर दावेदारी. जिल्हाप्रमुख रविद्रं शिदे

*तीनही जिल्हाप्रमुखांचा जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा निर्धार*

"हम साथ साथ है.." शिवसेना जिल्हाप्रमुखांची
 डरकाळी

चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची तिन विधानसभेवर दावेदारी.

फक्त बातमी 
चेतन लुतडे वरोरा 

         महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुका काही महीन्यातच होवु  घातल्या आहे. नुकतेच लोकसभा निवडणुक पार पडली असुन राज्यात शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे), कॅाग्रेस व राष्ट्रवादी कॅाग्रेस ( शरद पवार गट) हे तिन्ही पक्ष ईतर पक्षाना सोबत घेवुन महाविकासआघाडी करुन जनते समोर गेले व राज्याच्या जनते ने ही या महाविकासआघाडीला भरघोष यश दिले असल्याने भविष्यातही राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकी करीता हे तिन्ही पक्ष व ईतर मित्रपक्ष महाविकासआघाडी करुनच निवडणुकीला समोरे जाणार आहेत असे संकेत दिसत आहे .
 
राज्यात निवडणूकींचे वारे वाहु लागल्याने चंद्रपुर जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रात महाविकासआघाडीतील पक्षातील  नेते दावे प्रतिदावे करु लागले. कॅाग्रेसने सहाही विधानसभेवर आपलाच दावा सांगितला आहे . राष्ट्रवादी कॅाग्रेस ( शरद पवार गट) पक्षाने  तर जिल्यातील कोणताही एक विधानसभेची मागणी केली आहे. परंतु राष्ट्रवादी पक्षाचे स्थानिक नेत्याने बल्लारशहा विधानसभेचा हट्ट धरला आहे असे सुत्रा कडुन कळते. 
   अशातच शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख रविद्र शिदे यांनी बल्लारशहा, वरोरा व चंद्रपुर या तिन्ही विधानसभेवर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा दावा केला आहे.

        पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यातील पक्षाच्या सर्व पदअधिकारी व शिवसैनिकाना राज्यातील २८८ विधानसभानिहाय बाधंणी करुन निवडणुकी करीता तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.
       राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीकरीता  भविष्यात महाविकासआघाडीत निवडणुकाला समोरे जायचे असल्याने शिवसेना नेते,पुर्व विदर्भ सर्पकप्रमुख आमदार भास्कर जाधव  यांचे मार्गदर्शनात पुर्व विदर्भातील  विधानसभानिहाय तयारी लोकसभा निवडणुक संपताच सुरु झाली.यासदर्भात नुकतेच दि.१६ जुन २०२४ ला नागपुर येते आमदार भास्कर जाधव यांनी पुर्व विदर्भातील विधानसभानिहाय उमेदवाराची चाचपणी केली. यामध्ये आत्तापर्यंत निवडणुकीला सामोरे गेलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले होते. या संबंधित इच्छुक उमेदवारांचे अर्ज सुद्धा घेण्यात आले होते. 

      महाविकासआघाडीत विधानसभा निवडणुकीत समोर जायचे असल्याने चंद्रपुर जिल्ह्यातील चंद्रपुर, वरोरा व बल्लारशहा या तीन विधानसभा क्षेत्रावर  शिवसेना पक्षाचा  उमेदवार लढविण्याचा जिल्हाप्रमुखानी दावा केला असुन याबाबत पुर्व विदर्भ सर्पक नेते आमदार भास्कर जाधव यांचे सुचनेवरुन  बल्लारशहा, वरोरा व चंद्रपुर या तिन्ही विधानसभा निहाय माहीती सादर करण्यात आली.  याबाबत पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना सुध्दा ही माहीती  पुर्व विदर्भ सर्पक  नेते आमदार भास्कर जाधव यांनी अवगत केली.
 वरोरा,बल्लारशहा विधानसभेत वंदनिय हिन्दुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ८० टक्के सामाजिक व २० टक्के राजकारण सेवा अंगीकृत करुन  सतत सामाजिक कार्य, पक्षसंघटन, बाधणी  मागील काही वर्षापासुन सतत सुरु आहे. त्यासोबतच  चंद्रपुर विधानसभेवर सुध्दा दावा केला असुन चंद्रपुर विधानसभा सुध्दा शिवसेनेचा गड असुन चद्रपुर महानगरपालिकेत सतत नगरसेवक तसेच विधानसभाक्षेत्रातील जिल्हा परिषद क्षेत्रात  जिल्हा परिषद, पचायत समिती सदस्य सतत जनतेने निवडुन दिले आहेत.शिवसेनेचा चंद्रपुर महानगरपालिकेनयर उपमहापौर सुध्दा होता.जिल्हयात या पुर्वी शिवसेनेचे आमदार सुध्दा जनतेने निवडुन दिले आहेत. शिवसेना( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आजी - माजी पदअधिकारी शिवसैनिक व सर्व पक्षाच्या विग.जिल्हा सर्पकप्रमुख प्रशात  कदम यांचे मार्गदर्शनात जिल्हाप्रमुख जिद्दीने कामाला लागले असुन  या तिन्ही मतदारसघात  विधानसभा निवडणुकीची रणनीती आखणी तयारी सुध्दा सुरु असुन लवकरच पक्षप्रमुखाच्या आदेशाने पुर्व विदर्भ सर्पक नेते  आमदार भास्कर जाधव यांचे मार्गदर्शनात शिवसेना पदअधिकारी व शिवसैनिकातुन उमेदवारी देण्यात येईल. कुठलाही बाहेर उमेदवार आयात केला जाणार नाही अश्या सुचना सुध्दा पुर्व विदर्भ सर्पक प्रमुख शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव साहेब यांनी जिल्हाप्रमुखासह पदअधिकारी यांना दिल्या आहेत.

 चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात या पूर्वी चंद्रपूर महानगरपालिकेचा उपाध्यक्ष शिवसेनेचा राहिला आहे. स्वबळावर शिवसेनेने येथे बरेच नगरसेवक निवडून आले आहेत. सन २०१४ मध्ये शिवसेना स्व बळावर लढल्याने शिवसेना उमेदवारास ५१००० हजार मताधिक्य घेतले होते.यामुळे या विधानसभा क्षेत्रात शिवसेनेला चांगला वाव आहे. जयदीप रोडे हे मागील अनेक वर्षांपासून शहरात कार्यरत असून येथे सुपरिचित चेहरा आहे. 

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात रविंद्र शिंदे यांचे कार्य जोरदार सुरु आहे. रविद्र शिदे यांना सामाजिक,राजकिय व सहकार क्षेत्राचा अनुभव बघता त्यांची बाजु भक्कम असुन ते परिपक्व व मुसदी राजकारणी म्हणुन त्यांचे कडे बघितले जाते.वरोरा विधानसभा क्षेत्रात त्यांनी कोरोना काळापासून सतत काम करीत असुन सामाजिक उपक्रम राबवत पक्ष सघंटन सुध्दा मजबुतीने उभारले असुन प्रस्थापीताच्या विरोधात शिवसैनिकांना व पक्ष पदअधिकारी यांना सोबत घेवुन अनेक निवडणुका सतत जिंकल्या असुन विजयी रथ सुरुच आहे. 

मुकेश जिवतोडे यांनी आरोग्य क्षेत्रासाठी बरेच योगदान दिले असून कोळसा खदान कामगारासाठी त्यांनी लढा उभारला होता. वरोरा क्षेत्रातील कणखर नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. वरोरा भद्रावती मतदारसंघ  शिवसेनेचा बालेकिल्ला सुध्दा राहला आहेत. या दोन्ही जिल्हाप्रमुखांच्या मागे राजकीय अदृश्य शक्ती काम करत असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या क्षेत्रात राजकीय गुरू , किंग मेकर कोण ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुर्व विदर्भ सर्पक नेते आमदार भास्कर जाधव यांचा राजकिय अनुभव दाडगा असुन लोकहितार्थ निर्णय घेण्यास त्यांनी आपल्या शैलीत राज्याची विधानसभा गाजवली सुध्दा महाराष्ट्रातील राजकारणातील अजात शत्रु म्हणुन त्याचे कडे पाहल जाते.
            त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा पुर्व विदर्भात पक्षाला नक्कीच होणारच.
व त्याचे मार्गदर्शनात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तीनही जिल्हाप्रमुख व जयदीप रोडे संपूर्ण तयारीनिशी कामाला लागले असुन त्यांचे सुचनेवरुन  *हम सब साथ साथ है* ब्रीद वाक्य घेवुन जुने सर्व हेवेदावे विसरून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्ह्यातील तीनही जिल्हाप्रमुख एकत्र होवून कामाला लागले आहे. पक्ष संघटन मजबूत करुन जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा चंग तीनही जिल्हाप्रमुखांनी बांधला आहे.
      कोरोना काळात राज्यातील जनतेला कुटुबप्रमुख बनुन कोराना महामारी सकंटातुन तत्कालीन सरकार यशस्वी रित्या कार्यभार सांभाळला. इतकेच नव्हे लोकहिताचे निर्णय घेत शेतकरी बांधवांची एक वेळ नव्हे तर दोनदा कर्ज माफी केली शेती मालाला भाव सुध्दा शेतकरी बाधंवाच्या मनासारखा दिला ईतकेच बेरोजगाराना रोजगार देवुन समाजाच्या शेवटच्या टोका पर्यत सेवा दिली. जनतेने सुध्दा स्वीकृत करुन  नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल महाविकासआडी (ईडीया) च्या बाजुने देत भरघोष यश देत  एक प्रकारे महाविकासआघाडी सरकारच्या बाजुने विजया कल दिला. 
त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये चंद्रपुर जिल्यातील बल्लारशहा, वरोरा व चंद्रपुर या विधानसभावर आमचा दावा राहील असे जिल्हाप्रमुख रविद्रं शिदे यांनी स्पष्ट केले असुन याबाबत पक्षप्रमुखांचे जे आदेश राहील त्या आदेशाने निवडणुकांना समोर जाण्याचे ठरले आहे.



 

Comments